कोल्हापूर (प्रतिनिधी) : कसबा बावडा येथील श्री छ. राजाराम सह. साखर कारखान्याच्या चेअरमनपदी दिलीप भगवान पाटील यांची बिनविरोध निवड करणेत आली. आज (सोमवार) प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. एस. एन. जाधव यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये दिलीप भगवान पाटील यांच्या निवडीची घोषणा करणेत आली.

बैठकीमध्ये संचालक हरीश चौगले यांनी दिलीप पाटील यांचे नाव चेअरमन पदासाठी सुचविले. संचालक कुंडलिक चरापले यांनी अनुमोदन दिले. यानंतर पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यानंतर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, माजी आ. महादेवराव महाडिक आणि डॉ. जाधव यांचे हस्ते दिलीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पाटील हे पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील  रहिवासी असून सुमारे २० वर्षे  संचालकपदी कार्यरत आहेत. निवडीनंतर दिलीप पाटील यांनी चेअरमनपदी संधी दिल्याबद्दल महादेवराव महाडिक यांचे आभार मानले. त्यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या प्रगतीसाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचे सांगितले.

यावेळी व्हा. चेअरमन वसंत बेनाडे, मा. आ. अमलजी महाडिक, सर्व संचालक, मानद तज्ज्ञ सल्लागार पी. जी. मेढे, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, कारखान्यातील अधिकारी उपस्थित होते.