मुंबई (प्रतिनिधी) : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांचा समावेश आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाकीत केले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि पुदुच्चेरी या राज्यांपैकी फक्त आसाममध्ये सत्तेवर येऊ शकतो, असे पवार यांनी म्हटले होते.

यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी अशी भाकीते अनेक नेते करत होते. भाजपला फक्त १८० जागा मिळतील, पण अगोदरपेक्षा जास्त जागा भाजपला मिळाल्या. या निवडणुकांमध्येही भाजप हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष म्हणून आपल्या समोर येईल, 

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तसेच पश्चिम बंगालमधील नागरिक स्वाभिमानी असून बंगाली संस्कृतीवर आघात करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर संपूर्ण बंगाल एकसंघ होतो, असे सांगून आसाम वगळता भाजप सत्तेवर येणार नसल्याचा दावा शरद पवारांनी केला होता.