कोल्हापूर (प्रतिनिधी) : सलग १८ वर्षे सुरु असलेली श्री ज्ञानेश्वर माऊलीचा पालखी सोहळा भक्त मंडळ आणि जय शिवराय फुटबॉल  तरुण मंडळाच्या वतीने सुरु आहे. प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळची पालखी (दि. २०) जुलै रोजी कोल्हापूरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरापासून सकाळी आठ वाजता प्रस्थान होणार आहे.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते वंसतराव देशमुख, आ. ऋतुराज पाटील, महालक्ष्मी कँलेन्डरचे रणवीर शिर्के, ऋतुराज क्षीरसागर यांचे हस्ते आरती होणार आहे. जुना राजवाडा पोलिस स्थानकाचे प्रमोद जाधव, विश्व हिंदू परिषदेचे अँड. रणजितसिंह घाटगे यांच्या हस्ते माऊलींच्या अश्वाचे पूजन होणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या कालावधीत हा पालखी सोहळा होणार आहे. यामध्ये जिल्हयातील सुमारे ११० हून अधिक गावातील वारकरी यामध्ये सहभागी होणार असून ही दिंडी कोरोनाचे सर्व नियम पाळून पुर्ण केली जाणार असल्याचे दिंडी प्रमुख हभप आनंदराव लाड महाराज आणि बाळासाहेब पवार यांनी सांगितले. तसेच पूर्वसंध्येला होणारी नगर प्रदक्षिणा आणि सासने इस्टेट हॉल येथील रात्रीचे प्रवचन, किर्तन हे दोन्ही सोहळे शासकीय मार्गदर्शनानुसार रदद् केले आहेत.

तरी सर्व वारकऱ्यांनी गावामध्येच विठ्ठल मंदिरात आरती करावी, असे आवाहन संस्थापक संचालक दिपक गौड,  संचालक अँड.राजेंद्र किंकर, नगरसेवक शांरगधर देशमुख, संतोष कुलकर्णी, राजेंद्र मकोटे, संभाजी पाटील, गंगाधर दास,  हभप एम.पी.पाटील, संतोष रांगोळे यांनी केले आहे.  हा पालखी सोहळा भक्त मंडळ, जयशिवराय फुटबॉल मंडळ, राध्येय ग्रुपच्या वतीने केले आहे.