कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांनी रक्षाविसर्जन विधीसाठी महादेवाच्या ३० पिंडी पंचगंगा स्मशानभूमी येथे दान म्हणून दिल्या आहेत.

मागील १० वर्षे दीपक पोलादे यांच्याकडून पंचगंगा स्मशानभूमी येथे पिंडी दान तसेच मोफत तिरडी दिल्या आहेत. पंचगंगा स्मशानभूमीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांनाही त्यांनी पिंडी दान केल्या आहेत. 

प्रदूषणमुक्तीचा निर्धार जोपासून दीपक पोलादे यांनी एक मुठ रक्षा, पर्यावरण जोपासुया- गॅस दाहिनीचे स्वागत करुया, स्वच्छ, सुंदर स्मशानभूमी अशी जनजागृती करण्यावर भर दिला आहे.