कागल (प्रतिनिधी) : कोव्हिडचे लसीकरण पूर्ण झाल्यावरच मानवी जीवन पूर्ववत होणार आहे. येणाऱ्या काळात किमान ७०  टक्के लसीकरण पूर्ण व्हावेच लागेल, अशी अपेक्षाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. ते कागल ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४  वयोगटाच्या लसीकरण मोहिमेच्या कार्यक्रमावेळी बोलत होते.

कोव्हॅक्सीन लसीच्या पहिल्या डोसच्या या मोहिमेचा प्रारंभ कागलमधून करण्यात आला. यावेळी कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील यांनी, ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून दररोज २०० जणांना लसीकरण केले जाणार आहे. सध्यातरी कोव्हॅक्सीन या लसीचा पुरवठा झाल्याचे सांगितले.

यावेळी गटविकास अधिकारी सुशील संसारे, तहसीलदार शिल्पा ठोकडे, डॉ. प्रथमेश गडदे, डॉ. तृप्ती भोसले, डॉ. प्रियांका किल्लेदार, कल्पना रत्नाकर, सायली डाफळे, अनुप्रिया भोई, ओंकार कागले, जयंत खोत आदी उपस्थित होते.