निगवे खालसा (प्रतिनिधी) : जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामध्ये १६ मराठा बटालियनवर पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा या गावचे जवान हवालदार संग्राम शिवाजी पाटील शहीद झाले आहेत. वीर जवान हवालदार संग्राम पाटील १६ मराठा अशोक चक्र बटालियनचे जवान होते.

वीरमरण आल्याने निगवे खालसा गावासह परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. शहीद जवान हवालदार संग्राम पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. जवान संग्राम पाटील यांचा मुलगा इयत्ता दुसरीमध्ये शिकत आहे. तर मुलगी तीन वर्षांची आहे. ते दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. पण देश सेवेसाठी त्यांनी सर्व्हिस दोन वर्षांनी वाढवून घेतली होती.