कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील सानेगुरुजी वसाहत भागातील एकजुटी मंडळ, इंद्रप्रस्थनगर, शिवराम पोवार, काशीद कॉलनी, राजोपाध्याय नगर, कृपासिंधुनगरी आणि लक्ष्मी बलवंतनगर येथील अंतर्गत रस्ते कामाचा शुभारंभ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला.

कोरोनाच्या या संकटामुळे काही काळ शहरातील विकास कामे करता येत नव्हती. करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या कृपेने कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आपल्याला यश आले आहे. परंतु, जोपर्यंत यावर लस येत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले.

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर, गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, भिकाजी गावकर, बाबुराव भुरके, कुंडलिक साखळकर, हणमंत गणबावले, रंगराव ताटे, विनायक फाळके, किरण पाटील, मधुकर रामाने, सुवर्णा महादेव मोरे, माया तगारे, संध्या क्षीरसागर, उर्मिला सोनूर्लेकर,  तसेच भागातील मान्यवर, नागरिक उपस्थित होते.