कोल्हापूर (प्रतिनिधी) :  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आ. ऋतुराज पाटील यांच्यावतीने कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ७० हजार विद्यार्थ्यांना तिरंगा बॅचचे वाटप करण्यात आले. माजी पालकमंत्री आ. सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी मतदासंघातील विद्यार्थ्यांना तिरंगा बॅच, खाऊ आणि शुभेच्छा कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच कार्यकर्त्यांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना याचे वाटप केले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सध्या विविध उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आ. ऋतुराज पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी हा अभिनव उपक्रम राबविला आहे.