गारगोटी (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार प्रकाश आबिटकर गटाने सत्ता खेचून आणत सत्तांतर घडवून आणले. आबिटकर गटाचे ६ सदस्य निवडून आले. तर भाजपचे ३ सदस्य निवडून आले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी खानापूर गावासाठी मोठा निधी दिला होता. तरीही या गावातील लोकांनी शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या पॅनेलला बहुमत दिले व ग्रामपंचायतमध्ये सत्ता बदल केला. कृषी उत्पन बाजार समिती माजी संचालक बाळासाहेब भोपळे हे शिवसेनेचे आघाडी प्रमुख होते. खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने प्रथमच भगवा फडकवला आहे.