कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील खानापूर या घरच्या ग्रामपंचायतीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मुळ गावात शिवसेनेने धक्का दिला आहे. खानापूर गावात पहिल्या ६ जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. इथे आ. प्रकाश आबिटकर यांचे पॅनेल निवडून आले आहे.

पराभव स्वीकारावा लागल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. यावर ते म्हणाले की, एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. खानापूरमध्ये सहा पैकी तीन जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो, पण गावाने दिलेला कौल मान्य आहे. एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही. महाराष्ट्र म्हणजे चंद्रकांत पाटील आहे.