कोल्हापूर (प्रतिनिधी) : आ. चंद्रकांत जाधव हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत उद्योग क्षेत्रात प्रगती केली. एक तरुण उद्योजक या क्षेत्रात कसा यशस्वी होऊ शकतो, हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. उद्योगासोबत ते राजकारणात व समाजकारणात यशस्वी झाले. त्यांना पाच वर्षे काम करण्याची संधी मिळाली असती तर कोल्हापूरच्या विकासात चांगली भर पडली असती. त्यांचे सर्व क्षेत्रात अगदी बारकाईने व अभ्यास पूर्ण लक्ष होते. त्यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राचे मोठे नुकसान असून त्यांच्या कुटुंबियांच्यावर कोसळलेल्या दुःखात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सहभागी असल्याची भावना शोकसंदेशामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.