काँग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत पंतप्रधान मोदींना खर्गेंचं पत्र

दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहे. राजकीय पक्षांकडून सत्ता यावी यासाठी लोकांना आश्वासने दिली जात आहेत. यासाठी पक्षांकडून जाहिरनामे प्रसिद्ध केले जात आहेत. देशातील जनतेसाठी काँग्रेस आणि भाजपने जाहिरनामे प्रसिद्ध केले आहेत. तर काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहिरनाम्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी… Continue reading काँग्रेसच्या जाहिरनाम्याबाबत पंतप्रधान मोदींना खर्गेंचं पत्र

आता नाना फसणार नाही ; सांगलीच्या जागेवरून पटोलेंचं वक्तव्य

सांगलीत आज गुरुवारी (ता. 25 एप्रिल) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर नाना पटोले यांनीही सांगलीच्या जागेबाबत पाळलेले मौन सोडले. आता नाना फसणार नाही आणि सांगली काँग्रेसला दृष्ट ज्यांनी लावली ती उतरल्याशिवाय… Continue reading आता नाना फसणार नाही ; सांगलीच्या जागेवरून पटोलेंचं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्याला बळ देण्यासाठी प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करा : राजेश क्षीरसागर

विचारेमाळ परिसरातील पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जनहिताचे काम सुरु आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधी मध्ये सुख-दुःखाच्या प्रत्येक घटनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबांप्रमाणे सामील झाले आहेत. यासह राज्यातील जनतेला न्याय मिळून नागरिक सुखी समाधानी व्हावेत यासाठी विविध योजना, शासन… Continue reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्याला बळ देण्यासाठी प्रा.संजय मंडलिक यांना विजयी करा : राजेश क्षीरसागर

माझ्या बायकोला निवडूण दिलं तर…-अजित पवार

बारामती – सध्या लोकसभा निवडणुकीचं रणधुमाळी सुरु आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार प्रचाराला लागले आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना देखील पाहायला मिळत आहे. अशातच या प्रचारादरम्यान पवार कुटुंबियांमध्ये कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेला बारामती मंतदार संघ सर्वाधिक चर्चेचा विषय बनलेला आहे. माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया… Continue reading माझ्या बायकोला निवडूण दिलं तर…-अजित पवार

भाजपसाठी देशापेक्षा मोठं काहीही नाही , कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंब सर्वस्व : नरेंद्र मोदी

मध्य प्रदेश : आजकाल कॉंग्रेसचे राजपुत्र माझ्यावर रोज टीका करतात.त्यात त्यांना मजा येते.ते काहीही बोलतात.सोशल मीडिया आणि टीव्हीवरील लोक म्हणतात की, पंतप्रधानांसाठी असं बोलणं योग्य नाहीये. मोदीवर अशा पद्धतीने टीका केल्याने जनता दु:खी आहे.तुम्ही दुखी होऊ नका. ते प्रसिद्ध आहेत, पण आम्ही कामगार आहोत. भविष्यात ते खूप बोलतील. तुम्ही तुमचं डोकं खराब करू नका. त्यांच्या… Continue reading भाजपसाठी देशापेक्षा मोठं काहीही नाही , कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंब सर्वस्व : नरेंद्र मोदी

सांगलीच्या जागेचा वचपा काढणार ; विश्वजीत कदमांचा ठाकरे गटाला इशारा

सांगली: सांगलीत आज गुरुवारी (ता. 25 एप्रिल) काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरून शिवसेना ठाकरे गटाला चांगलेच सुनावले आहे. महाविकास आघाडीचा सांगली लोकसभेतून जो कोणी उमेदवार असेल, त्याला मिळणारी मते ही 100 टक्के काँग्रेसची असणार आहे. त्यामुळे आता पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही, यापुढे… Continue reading सांगलीच्या जागेचा वचपा काढणार ; विश्वजीत कदमांचा ठाकरे गटाला इशारा

फडणवीसांना पराभवाची भिती ; ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार थेटच

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या जाहीरनाम्याची आज पुण्यात घोषणा केली. गॅस आणि इंधनाचे दर कमी करण्यापासून ते आरक्षणाची मर्यादा वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश पवार गटाच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच जाहीरनामा ज्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला त्या वंदना चव्हाणही उपस्थित होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र… Continue reading फडणवीसांना पराभवाची भिती ; ‘त्या’ वक्तव्यावर शरद पवार थेटच

लोकसभा निवडणुकीनंतर मोठा राजकीय भूकंप होणार : खा. अशोक चव्हाण

मुंबई : काँग्रेसला सोडून भाजपात गेलेले माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातील खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात आणखी मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तर उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या दबावाखाली कांग्रेस नेते झुकले, असे म्हणत त्यांनी नाना पटोलेंवरही निशाणा साधला.… Continue reading लोकसभा निवडणुकीनंतर मोठा राजकीय भूकंप होणार : खा. अशोक चव्हाण

चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर कडाडले, म्हणाले..!

मुंबई – सध्या लोकसभा निवडणुकीची धुमाकूळ चालू आहे. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या प्रचारादरम्यान नेते आपली आक्रमक भूमिका मांडताना पाहायला मिळत आहे. वार प्रतीवार करत काही नेते अनेक गोप्यस्फोट देखील करत आहे. अशातच माजी कृषिमंत्री शरद पवारांनी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. “गेल्या दहा वर्षांत शेतकरी… Continue reading चंद्रशेखर बावनकुळे शरद पवारांवर कडाडले, म्हणाले..!

…तर प्रीतम मुंडे नाशिकमधून : पंकजा मुंडे   

बीड : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. बीड लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकीट कापून त्यांचा भगिनी  पंकजा मुंडे यांना उमेवारी दिली. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचं पुढं काय? त्यांना भारतीय जनता पार्टीकडून दुसरी कोणती जबाबदारी देण्यात येणार का? असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात आहेत.यातच पंकजा मुंडे… Continue reading …तर प्रीतम मुंडे नाशिकमधून : पंकजा मुंडे   

error: Content is protected !!