हायकोर्टाने मुंबई महापालिकेला ‘कंगना’वरून फटकारले…

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. त्याचप्रमाणे कंगनाला महापालिकेला पाठविण्यात आलेली नोटीस रद्द करण्यात आली आहे. कंगना तिच्या कार्यालयाचा ताबा घेण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कंगनाने सरकारविरोधात मत व्यक्त करताना संयम बाळगला पाहिजे, असे सुनावले आहे. मुंबई महापालिकेकडून १० सप्टेंबर… Continue reading हायकोर्टाने मुंबई महापालिकेला ‘कंगना’वरून फटकारले…

ते धोतर आहे का ?  : मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला

मुंबई (प्रतिनिधी) : हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे ?  हिंदुत्व सोडणे म्हणजे काय ? धोतर नाहीये ते… हिंदुत्व अंगामध्ये,  धमन्यांमध्ये असावे लागते. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपला लगावला. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची अभिनंदन … Continue reading ते धोतर आहे का ?  : मुख्यमंत्र्यांचा खोचक टोला

कोल्हापुरात दिसलेले पुण्याचे बेपत्ता उद्योजक अखेर सापडले…

पुणे (प्रतिनिधी) : महिनाभरापूर्वी आपल्या चालकाकडे लिफाफ्यात सुसाईट नोट देऊन गायब झालेले उद्योजक गौतम पाषाणकर अखेर आज (मंगळवार) दुपारी राजस्थानातील जयपूर येथील एका हॉटेलमध्ये सुखरूप सापडले. ते कोल्हापूर येथे काहीजणांना दिसल्याने पोलिसांनी विविध हॉटेल, लॉजमध्ये चौकशी केली होती. ते मोठे उद्योजक असल्याने आणि त्यांच्या बेपत्तामागे राजकीय कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने पोलिसांनी व्यापकपणे तपास मोहीम… Continue reading कोल्हापुरात दिसलेले पुण्याचे बेपत्ता उद्योजक अखेर सापडले…

केंद्र सरकारकडून आणखी ४३ अॅप्सवर बंदी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पब –जी नंतर भारत सरकारनं आणखी ४३ मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे. भारतीय युजर्ससाठी ही सर्व अॅप्स ब्लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या अनुच्छेद ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेतला गेला. देशाची अखंडता, सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेच्या दृष्टीनं धोका असल्याचं कारण सरकारने दिले… Continue reading केंद्र सरकारकडून आणखी ४३ अॅप्सवर बंदी…

‘त्यांनी’ सांगितल्यानेच मुंबई महापालिकेची सत्ता सोडली, अन्यथा… : चंद्रकांतदादा पाटील

पुणे (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत सत्ता आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे. नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये मुंबई महापालिकेवर भाजप झेंडा फडकेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी व्यक्त केला. मागल्या वेळेस पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले म्हणून आम्ही मुंबई महापालिकेत सत्तारूढ होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, आता मात्र तसे होणार नाही, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी… Continue reading ‘त्यांनी’ सांगितल्यानेच मुंबई महापालिकेची सत्ता सोडली, अन्यथा… : चंद्रकांतदादा पाटील

ग्रामीण भागात १०० दिवसांत ८.८२ लाखांवर घरकुलांची निर्मिती : ना. मुश्रीफ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचा निवारा देणाऱ्या विविध योजना गतिमान करुन घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ‘महाआवास अभियान-ग्रामीण’ राबविले जाणार आहे. राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन या १०० दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले… Continue reading ग्रामीण भागात १०० दिवसांत ८.८२ लाखांवर घरकुलांची निर्मिती : ना. मुश्रीफ

पंढरीत कार्तिकी एकादशी यात्रा काळातही संचारबंदी…

पंढरपूर (प्रतिनिधी) : अनलॉक-५ अंतर्गत राज्यात विविध व्यवसाय, उद्योग, चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी देण्यात आली. मागील आठवड्यात मंदिरे, प्रार्थनास्थळे सुरू करण्याची मुभा देण्यात आली. मात्र पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. त्यामुळे आता कार्तिकी एकादशी यात्रा काळात पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीप्रमाणे संचारबंदी लागू होणार आहे. त्याचप्रमाणे चार दिवस एसटी बससेवा बंद राहणार असल्याचे अतिरिक्त पोलीस… Continue reading पंढरीत कार्तिकी एकादशी यात्रा काळातही संचारबंदी…

पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक : अनेक दहशतवाद्यांचा खातमा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे. ‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी छावण्या उदध्वस्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची ही तिसरी मोठी कारवाई आहे. मात्र, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून आज कोणताही गोळीबार झालेला नाही, अशी प्रतिक्रिया सैन्यदलाच्या प्रवक्त्याने व्यक्त… Continue reading पाकव्याप्त काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक : अनेक दहशतवाद्यांचा खातमा

लवकरच वृत्तवाहिन्यांसाठी नियमावली : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार वृत्तवाहिन्यांसाठी नियमावली जारी करण्याचा आणि नियामक यंत्रणाही बळकट करण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये कामामध्ये हस्तक्षेप करणे किंवा त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचा उद्देश नाही, मात्र, वृत्तवाहिन्यांवर देखरेख ठेवण्याची गरज आहे,असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. एका वेबिनारमध्ये जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली. सध्या प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा… Continue reading लवकरच वृत्तवाहिन्यांसाठी नियमावली : प्रकाश जावडेकर

मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला चढवून अनेकांचे बळी घेतले, कोट्यवधींचे नुकसान केले. या वेळी देशभरात पाकिस्तानविरुद्ध अत्यंत संतापाची भावना असताना तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने या हल्ल्याचा निषेध करण्याशिवाय पाकिस्तानविरुद्ध कोणतीच कारवाई केली नाही. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारने असा कचखाऊपणा का दाखवला, याविषयी अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा… Continue reading मनमोहन सिंग अन् २६/११ हल्ल्याबाबत बराक ओबामांचा धक्कादायक दावा…

error: Content is protected !!