मुंबई (प्रतिनिधी) :  उत्तराखंडमध्ये हिमवादळामुळे त्रिशुल शिखरावर मुंबईचे पाच गिर्यारोहक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या गिर्यारोहकांचा लष्कराकडून शोध घेण्यात येत आहे. तसेच भारतीय नौदलाचे दहा जवान बेपत्ता झाले आहेत. सध्या त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हे वीस जवान गिर्यारोहण करण्यासाठी माऊंट त्रिशूलवर जात होते.

या हिमवादळात भारतीय नौदलाचे दहा जवान बेपत्ता झाले आहेत. सध्या त्यांचा शोध घेण्यात येत आहे. हे वीस जवान गिर्यारोहण करण्यासाठी माऊंट त्रिशूलवर जात होते. मात्र शिखर चढत असताना हा अपघात झाला. कुमाऊंमधील बागेश्वर जिल्ह्यातील चमोली जिल्ह्याच्या सीमेवर माऊंट त्रिशूल आहे. त्रिशूलच्या शिखरावर जाण्याच्या प्रयत्नात असताना हिमस्खलन झाल्याने पाच जण बेपत्ता झालेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. हेलिकॉप्टर, लष्कर, हवाई दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि ग्राउंड रेस्क्यू टीम सध्या शोध मोहीम राबवत आहे.