गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याकडे १०० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. असा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे राज्याची सगळीकडे बदनामी झाली असून गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी गडहिंग्लज भाजपने केली आहे. तसेच यावेळी गृहमंत्री देशमुख यांच्या विरोधात प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेही केली.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागितलेली १०० कोटी रुपयांची रक्कम ही मोठी असून त्याची इडी मार्फत चौकशी करावी. या प्रकरणात आणि कोण बडे मासे आहेत, त्यांना देखील बाहेर काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.