कोल्हापूर (प्रतिनिधी) : ईडीची धाड हे त्या खात्याचे एक नित्यक्रम आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही, असा खुलासा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प!कारांशी बोलताना केला. 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू आहे. त्यानंतर थेट समोर येऊन लढा, शिखंडीप्रमाणे कारवाया करू नका, असे आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘निवडणुका होईपर्यंत पक्ष असतो, आणि निवडून आल्यानंतर ते सरकार असते. यामुळे, त्या सरकारमध्ये ढवळाढवळ करण्याची आमची संस्कृती नाही. देशात कोणतीही घटना घडली तर त्यामध्ये भाजपचाच हात आहे, असे म्हटले जात आहे. त्यामुळे, आमचा हात जरा जास्तच भक्कम दिसत आहे. जर एखाद्यावेळी पाऊस कमी पडला किंवा पाऊस जास्त पडला, तर त्यामागेसुद्धा भाजपचा हात आहे, असेही म्हणतील.’