कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यामधील ग्रामीण भागात नवीन रास्तभाव धान्य दुकान देण्यासाठी सन २०२१ चा जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. तरी इच्छूक संस्थांनी / महिला बचत गटांनी/ स्थानिक स्वराज्य संस्थांनी विहीत मुदतीत सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.

पन्हाळा –  गुडे/सोमवार पेठ,  नावली, बहिरेवाडी, पिंपळे तर्फ सातवे, मौजे कोतोली व वारणा. कागल – बोरवडे, माद्याळ  व पिंपळगाव खुर्द. करवीर –  शिरोली दुमाला,  येवती, खेबवडे व गर्जन, कळंबे तर्फ कळे, घानवडे, सोनतळी  व वसगडे. शाहूवाडी – मोळावडे, वडगाव, करंजोशी, ओकोली व कोळगाव, आजरा – दाभिळ, गगनबावडा – पळसंबे, तळये बु. व खोकुर्ले अशा एकूण २६ गावांसाठी नवीन रास्तभाव धान्य दुकानांकरिता अर्ज करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे.

अर्जदार संस्थांनी अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संबंधित तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. अर्ज करण्यासाठीच्या पात्रतेचे निकष व अटी शर्ती संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती, गाव चावडी व संबंधित ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.