कोल्हापूर (प्रतिनिधी) : उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटासाठी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देण्यात येतो. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत सन २०२०-२१ या वर्षात देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी महिला सक्षमीकरण या विषयावर उत्कृष्ट लेखन केलेल्या इच्छुक आणि पात्र पत्रकारांनी आपले प्रस्ताव ५ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या सहसंचालकांनी केले आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील उमेद अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता गटासाठी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या पत्रकारांनी आपले नाव, पासपोर्ट साईज फोटो, दैनिकाचे नाव व केलेल्या लेखनाचे प्रस्ताव जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, कोल्हापूर येथे सादर करावेत.