कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापुरातील भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने ‘अमृत भारत’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि.१२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार सर्व नागरिक ‘हर घर तिरंगा’, ‘घर घर तिरंगा’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेरित होत आहे. भाजपा राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा वानथी श्रीनिवासन आणि केंद्रीय महिला मोर्चा पदाधिकारी, आमदार यांची उपस्थिती असणार आहे.

कोल्हापुरातील ‘अमृत भारत’ या कार्यक्रमामध्ये संगीत संयोजक राजेंद्र मेस्त्री व नृत्य संयोजक भालकर्स कला अकादमीचे कलाकार देशभक्तीप्र गीतांच्या माध्यमातून संगीत आणि नृत्य कला सादर करणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आ. उमाताई खापरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा गायत्री राऊत, महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आणि सहकारी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.