मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणचे व्यवसाय शासनाच्या अटीस अधीन राहून शुक्रवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज (बुधवार) दिली आहे.

ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी, ज्या विभागामध्ये बाधित रुग्णांची संख्या कमी आहे अशा जिल्ह्यातील सर्व शहरे आणि गावांमधील छोटे-मोठे व्यवसाय सुरू व्हावेत यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट आज सकाळीच भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीला यश आले असून शुक्रवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना आपले व्यवसाय उद्योग सुरू करण्यास मुभा मिळणार आहे.