मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान कर्णधारपदी मुंबईकर अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेत अजिंक्य रहाणे मुंबईचे नेतृत्व करणार आहे. रणजी ट्रॉफीसाठी एमसीएने मुंबई संघाची घोषणा केली आहे.

रणजी स्पर्धेच्या १३ व्या मोसमाची सुरुवात ही येत्या १३ डिसेंबरपासून होणार आहे.  महामुकाबला अर्थात अंतिम सामन्याचे आयोजन हे १६-२० फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. दरम्यान मुंबई आपला पहिला सामना हा आंध्र प्रदेश विरुद्ध खेळणार आहे. दुसरा सामना २० डिसेंबरला हैदराबाद विरुद्ध असणार आहे.