पुणे (प्रतिनिधी) : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्याजवळील नवले पुलानजीक भरधाव ट्रकने तब्बल १५ वाहनांना धडक दिली. या विचित्र आणि भीषण अपघातात ३ ते ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी घडली. यामुळे ८ वर्षापूर्वी झालेल्या एसटी अपघाताच्या आठवणी पुणेकरांच्या जाग्या झाल्या. 

नवले पुलाजवळ १५ गाड्या एकमेकांना धडकल्या. भरदिवसा असा विचित्र अपघात झाल्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. पोलीस रस्त्यामधील वाहने बाजूला करण्याचे काम करीत आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.