कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,९१९ जणांना कोरोनाची लागण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हय़ात आज (सोमवार) गेल्या २४ तासांत कोरोनाने ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १,९१९ जणांना कोरोनाची लागण झाली असून १,२९७ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आल्यांमध्ये आजरा ३६, भुदरगड ६८, चंदगड ६३, गडहिंग्लज ८६, गगनबावडा १३, हातकणंगले १८९, कागल ५३, करवीर ३०३, पन्हाळा १४६, राधानगरी २६, शाहूवाडी २९, शिरोळ २९, नगरपालिका… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात १,९१९ जणांना कोरोनाची लागण…

आजऱ्यामध्ये ४ लाख ७० हजारांचे अवैध मद्य जप्त…

आजरा (प्रतिनिधी) : आजरा-आंबोली मार्गावर तुलसी धब्यानाजीक आज सायंकाळी आजरा पोलिसांनी कारवाई करत गोवा बनावटीची एका टेम्पोंसहीत ४ लाख ७० हजार किंमतीचे मद्य जप्त केले. यामध्ये शिवाजी ग्यानबा भुते आणि गणेश महादेव पिंगळे हे दोघे (रा. खर्डा ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना आजरा पोलिसांनी अटक केली आहे. तसेच टेम्पो (एमएच ४२ बी ९८७३) हा जप्त… Continue reading आजऱ्यामध्ये ४ लाख ७० हजारांचे अवैध मद्य जप्त…

इचलकरंजीमध्ये भाजपा सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबदल शहरात स्वच्छता अभियान…  

इचलकरंजी (प्रतिनिधी) : भाजपा सरकारला आज सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इचलकरंजी शहरात आज भाजपाच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आ. सुरेश हाळवणकर यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, माजी भाजपा शहराध्यक्ष शहाजी भोसले, भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या मार्गदर्शनाखाली आयजीएम हॉस्पिटल आणि परीसरामधे स्वच्छता अभियान तसेच औषध फवारणी करण्यात… Continue reading इचलकरंजीमध्ये भाजपा सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबदल शहरात स्वच्छता अभियान…  

पूरस्थितीत अधिकाऱ्यांनी आघाडीवर कार्यरत रहावे : ना. जयंत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : धरणक्षेत्र वगळता सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका बसतो. संभाव्य पूरस्थितीबाबत अधिकाऱ्यांनी धरणातील उपलब्ध पाण्याचे आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच पूरस्थितीत आघाडीवर कार्यरत रहावे, अशा सुचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केल्या. ना. जयंत पाटील म्हणाले की, या नैसर्गिक आपत्तीचा तिन्ही जिल्ह्यांना प्रचंड फटका बसतो. तो बसू… Continue reading पूरस्थितीत अधिकाऱ्यांनी आघाडीवर कार्यरत रहावे : ना. जयंत पाटील

जिल्ह्यात १५ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात यापुर्वीच्या सर्व प्रतिबंधात्मक आदेश आणि स्पष्टीकरणांना १ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते दिनांक १५ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. पत्रकात म्हटले आहे की,  दुकानांना पुरवठा केल्या जाणाऱ्या वस्तुंच्या वाहतूकीवर निर्बंध नाहीत. मात्र, दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री… Continue reading जिल्ह्यात १५ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी : जिल्हाधिकारी

आशा सेविकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार : शौमिका महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आशा सेविका तुटपुंज्या मानधनावर सेवा बजावत आहेत. त्यांच्या या प्रश्नाबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून आशा सेविकांच्या बाजू त्यांच्यासमोर मांडू आणि त्यांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहिती जि.प.च्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी दिली. त्या गडमुडशिंगी येथे आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांच्या सत्कारावेळी बोलत होत्या. शौमिका महाडिक म्हणाल्या की,… Continue reading आशा सेविकांच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावणार : शौमिका महाडिक

आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत लग्न केल्याप्रकरणी ५० लोकांवर गुन्हा…

गारगोटी (प्रतिनिधी) : आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत विनापरवाना दारात मंडप टाकून गर्दी जमवून लग्नकार्य केल्याबद्दल वरपिता, नवरा-नवरी, भटजीसह ५० लोकांवर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथे शिवाजी केरबा पाटील यांच्या मुलाचे लग्न होते. यावेळी विनापरवाना दारात मंडप टाकून कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता लोकांच्या उपस्थितीत  लग्नकार्य… Continue reading आदमापूर येथे संचारबंदीचे उल्लंघन करीत लग्न केल्याप्रकरणी ५० लोकांवर गुन्हा…

शिंगणापूर मधील पर्सनल पॉवर तरुण मंडळाच्या वतीने ५ हजार शेणी दान…

शिंगणापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लोकांच्या मृत्यूचे प्रमाण खूप वाढलं आहे. यामुळे पंचगंगा स्मशानभूमी येथे शेणी आणि लाकडाचा तुटवडा जाणवत आहे. अशावेळी शेणी दान करावेत, असे आवाहन प्रशासनाच्यातर्फे करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत  शिंगणापूर येथील पर्सनल पॉवर तरुण मंडळाच्या वतीने ५ हजार शेणी दान स्वरुपात देण्यात आल्या. यावेळी गणेश चव्हाण, किशोर पाटील, संतोष… Continue reading शिंगणापूर मधील पर्सनल पॉवर तरुण मंडळाच्या वतीने ५ हजार शेणी दान…

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घालण्याची गरज : ए. वाय. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाला आज अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांची फार मोठी गरज आहे. यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घातला पाहिजे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले. ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती दिनानिमित्त कोल्हापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोलत होते. महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे सरचिटणीस… Continue reading राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर घालण्याची गरज : ए. वाय. पाटील

मुरगूडमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने…

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूडमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती साधेपणाने संपन्न करण्यात आली. यशवंत सेना, मुरगुड धनगर समाजाच्या वतीने येथील नगरपालिका सफाई कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांना कॉ. बबन बारदेस्कर यांच्या हस्ते  शंभर मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आले. यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांच्या कार्याची माहिती आप्पाजी मेटकर यांनी… Continue reading मुरगूडमध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने…

error: Content is protected !!