कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पथकाच्या वतीने राजारामपुरी,  ग्रीन पार्क, राजेंद्रनगर, कांझारभाट आणि शिवाजी विदयापीठ परिसरात आज (मंगळवार) १ लाख ४ हजार रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले.  यापुढील काळात थकीत पाणी बिलाची वसुली गतीने केली जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख मोहन जाधव यांनी सांगितले.

याबरोबरच थकीत पाणी बिलासाठी या पथकाने ग्रीन पार्कमधील दोन नळ कनेक्शन धारकांची पाणी कनेक्शन बंद केली आहेत. ही कारवाई पाणीपुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख मोहन जाधव,  मीटर रिडर संदीप माळी, रमेश मगदूम, पृथ्वी चव्हाण, फिटर तानाजी माजगांवकर यांनी सहभाग घेतला.