पेठवडगाव (प्रतिनिधी) : नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात एक लाख ७५ हजार टन उसाचे गाळप केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
चालू गळीत हंगामात ३० नोव्हेंबरअखेर अवघ्या ३८ दिवसांत हे गाळप केल्यास सरासरी १०.७२ उताऱ्याने एक लाख ८६ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
१५ नोव्हेंबरअखेर गाळप झालेल्या ७० हजार ८४२ उसाची एक रकमी एफआरपी प्रमाणे २९०० रुपये प्रतिटन अशी २०.५४ कोटी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकात दिली आहे. चालू गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळपचे उद्दिष्ट असून, कार्यक्षेत्रातील उत्पादकांनी कारखान्याकडे नोंद केलेला ऊस गाळपासाठी पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.