जळगाव (प्रतिनिधी) :  श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर केलेल्या हल्ल्यात जळगांव जिल्ह्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख शहीद झाले. या हल्ल्यात भारताच्या दोन जवानांना वीरमरण  आले. श्रीनगर जवळील एचएमटी येथे गुरूवारी (दि.२६) दुपारी  गस्त घालत असताना दहशतवाद्यांनी सैन्य दलाच्या तुकडीवर भ्याड हल्ला केला.

२१ व्या वर्षी प्रशिक्षण झाल्यानंतर यश देशमुख यांची गेल्या सात महिन्यापूर्वीच  पहिलीच पोस्टींग श्रीनगरला झाली होती. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावात शोककळा पसरली आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वीच यश देशमुख यांची लष्करात रुजू झाले होते. दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.