टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी संग्राम बाजीराव लोहार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिवाजी पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज (सोमवारी) विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच रूपाली तावडे होत्या.

टोप ग्रामपंचायतीवर शिवसेना प्रणित टोप ग्रामविकास आघाडीची निर्विवाद सत्ता आहे. उपसरपंच पदासाठी रोटेशन पध्दतीने सर्वांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिवाजी पाटील यांनी राजीनामा दिला होता. उपसरपंच पदासाठी संग्राम लोहार यांनी एकमेव अर्ज दाखल केला. त्यास विठ्ठल पाटील यांनी अनुमोदन केले.

यावेळी आघाडीचे नेते धनाजी पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, लक्ष्मण पाटील, शिवाजी पाटील, बाळासो कोळी, विजय पाटील, श्रीरंग तावडे, राजू कोळी, रंजना पाटील, भारती चौगुले, रेखा चौगुले, दिपाली धनगर, अंजना सुतार, रोहिणी कांबळे आणि ग्रामविकास अधिकारी डी.आर देवकाते आदी उपस्थित होते.