मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश ‘एमएमआरडीए’ला न्यायालयाने आज (बुधवार) दिले. यावरून आता भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठविण्यास सुरूवात केली आहे. भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात, असा टोला भाजप नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

मेट्रो कारशेडचा प्रकल्प बारगळणार, कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम तात्काळ थांबवण्याचे  ला निर्देश…गुडघ्यात मेंदू असलेले सरकार सत्तेवर असले की असे प्रकार घडतात. जनतेची विटंबना, वेळेचा अपव्यय, पैशाचा चुराडा आणि अब्रूचे खोबरे हीच महाविकास आघाडी सरकारची खरी कमाई… असे भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.