मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे नेते व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या तरूणीने बलात्कार केल्याचा गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. तर मुंडेंनी फेसबुकवर पोस्ट टाकत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. तर दुसरीकडे मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

ज्या वेळी अत्याचार झाला त्याच वेळी गुन्हा दाखल करायचा होता. २००६ पासून २०२० पर्यंत का शांत बसला?, बलात्कार हा त्या महिलच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने होत असतो. संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार हा बलात्कार नसतो, असे रूपाली पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. राजकारणांनो बलात्कार हे तुमच्या राजकारण खेळी बनवून नका आणि बायांनो तुमच्या संमतीचे शारीरिक संबंध हे राजकारणात कोणाला वापरून देऊ नका. तुमच्यामुळे आमच्या खरोखर पीडित बलात्कार झालेल्या अन्याय झालेल्या भगिनींला न्याय मिळत नाही. याची एक महिला म्हणून लाज बाळगा, असेही पाटील यांनी म्हटले आहे.