कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रतिकूल परिस्थितीत काम करून गोकुळला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी सेवेतून निवृत्त होत आहेत. त्याची मनाला खंत वाटत आहे. पण नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच सेवानिवृत्त व्हावे लागते. कर्मचा-यांच्या कष्टाची जाणीव गोकुळ नेहमीच ठेवेल, असे प्रतिपादन माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांनी केले.
गोकुळच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. गोकुळ दूध प्रकल्प कार्यस्थळावर कार्यक्रम झाला. नरके म्हणाले की, कर्मचा-यांनी गोकुळसाठी सुरुवातीच्या काळात अल्प पगारावर कष्टाचे काम केले आहे. यावेळी ३२ सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सन्मान नरके यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी संचालक रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरूण डोंगळे, विश्वास जाधव, धैर्यशील देसार्इ, दिपक पाटील, पी.डी.धुंदरे, उदय पाटील, बाळासो खाडे, बाबा देसाई, रामराज कुपेकर-देसाई, संचालिका जयश्री पाटील-चुयेकर, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील, व्यवस्थापक प्रशासन डी.के.पाटील आदी उपस्थित होते.