मुंबई (प्रतिनिधी) : ‘तांडव’ या ऍमेझॉन प्राईमच्या वेब सीरीजमध्ये धार्मिक भावना दुखावून उत्तर प्रदेश पोलिसांची चुकीची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या  वेब सीरीजविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. आमच्याकडेही या वेब सीरीजची तक्रार केली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या कोणाचेही नियंत्रण नाही, त्यामुळे हा वाद निर्माण होत आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

देशमुख म्हणाले की, नियमानुसार त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारने नियंत्रण आणण्यासाठी कायदा तयार करण्याची गरज आहे. दरम्यान, ‘तांडव’ चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ट्विट करत सर्वांची माफी मागितली आहे. या वेब सीरीजचे दोन मुख्य भाग असून पहिला भाग डिस्क्लेमर सारखा आहे. तो सीरीज सुरू होण्यापूर्वी दाखवला असल्याचे जफर यांनी सांगितले.