दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जिल्ह्यातील मान्यवर साहित्यिकांनी पाठिंबा जाहीर केला. नवे कृषी कायदे करून शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांना तडफडत जगावं लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांनी संताप व्यक्त केला.