मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका उद्या बुधवारपासून सुरू होणार आहे. दरम्यान, मालिकेच्या आधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा मधल्या फळीतला फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे.

बीसीसीआय़ने श्रेयस अय्यर एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नसल्याचे म्हटले आहे. श्रेयस अय्यरच्या जागी रजत पाटीदारची संघात वर्णी लागली आहे. श्रेयस अय्यरच्या पाठीला दुखापत झाली आहे. दुखापतीवर उपचार घेण्यासाठी आणि फिट व्हायला श्रेयसला आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जावे लागेल.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका १८ जानेवारीपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी हैदराबादमध्ये होणार आहे.