कोल्हापूर (प्रतिनिधी) : टेंबलाई टेकडी आणि मंदिर परिसरातील अस्वच्छता, प्लास्टिक कचरा, वाढलेले गवत, ओल्या पार्ट्यांमुळे मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे. येथे येणाऱ्या भाविकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. टेंबलाई मंदिराची देखरेख पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने केली जाते. परंतु अनेक वर्षांपासून मंदिर परिसराची डागडुजी न झाल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. 

यासाठी याठिकाणी कायमस्वरुपी स्वच्छता कर्मचारी नेमावेत, परिसराची सुरक्षितता राखण्यासाठी वॉचमन नेमावा अशी मागणी ‘आप’च्या शिष्टमंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांच्याकडे केली.

यावेळी आपचे शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, शहर संघटनमंत्री सुरज सुर्वे, शहर संघटक संजय साळोखे, बबन कावडे, प्रसाद सुतार, अमित कांबळे, शशिकांत हाबळे, राज कोरगांवकर, प्रथमेश सुर्यवंशी, मयुर भोसले, समीर लतिफ, नागरिक उपस्थित होते.