दिल्ली (वृत्तसंस्था) :  पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांची. भारतीय हद्दीत शस्त्रे घेऊन आलेली पाकिस्तानी बोट जप्त करण्यात आली आहे. या बोटीवर १०  खलाशी, शस्त्रे आणि दारुगोळा होता.

या बोट मध्ये सुमारे ४० किलो वजनाचे आणि अंदाजे ३०० कोटी रुपये किंंमतीचे अमली पदार्थही या बोटीवरून जप्त करण्यात आले. गुजरात एटीएसने दिलेल्या गुप्त माहितीनंतर भारतीय तटरक्षक दलाने ही धडक कारवाई केली. मुंबईतील २६/११ सारखा दहशतवादी हल्ला घडवण्याचा कट पाकिस्तानने पुन्हा एकदा आखलाय की काय, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे.