कागल (प्रतिनिधी) : शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत कागल तालुक्यातील लाभार्थ्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदानाची रक्कम भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली. त्या मंजुरी पत्राचे वाटप समरजितसिंह घाटगे आणि राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते लाभार्थ्याना करण्यात आले.

राज्य शासनाच्या विशेष सहाय्य योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयातील घरातील कमावत्या व्यक्तीचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास प्रत्येकी २० हजार रुपये प्रमाणे अनुदान दिले जाते. पण, या लाभार्थ्यांचे गेली अडीचवर्षे हे प्रस्ताव प्रलंबित होते. याबाबत समरजितसिंह घाटगे यांनी पाठपुरावा करत याबाबत मंजुरी मिळवली. लवकरच या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.

यामध्ये गीतांजली भाले (रा. चिखली), उज्वला कांबळे (रा. चिमगांव), लता पाटील (रा. यमगे) यांचा समावेश आहे. यावेळी अरुण गुरव यांच्यासह आदी उपस्थित होते.