पंढरपूर (प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कोणाच्याही घराला धक्का न लावता त्यांनी पंढरपूरचा विकास केला, तर त्यांची आम्ही पंढरपुरातून हत्तीवरून मिरवणूक काढू, अशी घोषणा  बैठकीमध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमधील स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वारकऱ्यांची बैठक पार पडली. पंढरपूर कॉरिडोरला स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचा विरोध आहे. याच मुद्दयावरून आम्ही कर्नाटकमध्ये जातो, असा इशारा देखील पंढरपूरच्या नागरिकांनी दिला होता. पंढरपूरमधील कुठल्याही नागरिकाच्या घराला धक्का न लावता, कोणाचेही विस्थापन न करता पंढरपूरचा विकास करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये दिले होते.