टोप (प्रतिनिधी) : टोप गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच गावातील तळागळातील नागरिकांना सर्वतोपरी मदत होण्यासाठी टोप विकास पॅनेल प्रयत्नशील आहे. या निवडणुकीत पॅनेलचा विजय निश्चित असून, सर्वांनी गावची सेवा करण्याची संधी द्यावी आणि विकासकामास सहकार्य करून पाठबळ द्यावे, असे आवाहन माजी सरपंच पिलाजी पाटील यांनी केले आहे.

गावातील अनेक नागरिकांना आपले गाव, आपली ग्रामपंचायत वाटली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून विकास घडवण्याचे काम आमच्याकडून केले जाणार आहे. टोप विकास पॅनेलचा विजय हा जनतेचा विजय असून, ग्रामस्थांनी या निवडणुकीत टोप विकास पॅनेलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन पाटील यांनी केले.