मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला असून, आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे’, अशा प्रतिक्रिया आता महाराष्ट्रातून व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्यातच आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे गदगमध्ये दहन केले गेल्याने हे वातावरण आणखी चिघळणार की काय. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे की, कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जो काही कर्नाटकात उच्छाद मांडला आहे. तो चुकीचा असून, कन्नडिगांच्या ॲक्शन महाराष्ट्रही रिॲक्शन देईल, असा इशारा खासदार अरविंद सावंत यांनी दिला आहे.