मुंबई (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून निश्चित झाले आहे. गौरी भिडे यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. दरम्यान न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा गंभीर आरोप गौरी भिडे यांनी केला आहे. त्याच सोबत उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेची सीबीआय आणि ईडीकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, या मागणी  याचिकेवर २२ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप आरोप केला. गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. २२ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा गौरी भिडे यांनी नव्या खंडपीठापुढे धाव घेतली आहे.