कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी शुक्रवारी त्यांना जिल्हा परिषदेत अभिवादन करण्यात आले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कोल्हापूर केंद्र आणि जिल्हा परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त पत्रकार समीर देशपांडे यांचे पंचायत राज व्यवस्थेचे संस्थापक यशवंतराव चव्हाण या विषयावर व्याख्यान झाले. महाराष्ट्राची राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा. संस्कृती याची वाटचाल कशी असावा, याची मांडणी चव्हाण यांनी केली. देशामध्ये महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य समजले जाते. त्याची पायाभरणी चव्हाण यांच्या पहिले मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामकाजात आहे असेही ते म्हणाले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रतिष्ठानचे अशोक पोवार यांनी प्रास्ताविक केले, तर रोहित पाटील यांनी आभार मानले. जयश्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तत्पूर्वी व्ही. बी. पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला.
यावेळी जि.प.चे विभागप्रमुख व्ही. एस. सांगावकर, दीपक घाटे, विलास पाटील, डॉ. योगेश साळे, डॉ. विनोद पवार, पद्मजा तिवले, विनोद डुणुंग, प्रतिष्ठानचे विश्वस्त रमेश मोरे, सीमा पाटील, डॉ. मंजुश्री पवार, भरत रसाळे, प्रा. मधुकर पाटील, राजू मालेकर यांच्यासह जि.प. चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.