मुंबई (प्रतिनिधी) : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा मागील अनेक वर्षांपासून पुनर्विकास रखडला आहे. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात येताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली आहे.
लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. देसातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेला अदानी ग्रुप धारावीचा पुनर्विकास करणार आहे. कंत्राट दाराच्या शर्यतीत अदानी ग्रुप आघाडीवर आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा तब्बल २३ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानी समूह इच्छुक आहे. अदानी समूहासह नमन ग्रुप आणि डीएलएफ कंपनी या तीन मोठ्या विकासकांनी धारावीच्या पुनर्विकास निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याची माहिती एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांनी दिली. तसेच ६०० एकरांंवर पसरलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे कंत्राट कुणाला मिळणार, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.