कोल्हापूर (प्रतिनिधी) : पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेंतर्गत रेल्वे विभागाकडून ५३ लाख ३४ हजार ९९० रुपये वसूल करण्यात आले. शहरातील इतर २३ नळ कनेक्शन खंडित करुन इतर थकबाकीदारांकडून दि. ७ ते १० ऑक्टोंबर अखेर रु.६४ लाख १५ हजार ६१५ रक्कम वसूल करण्यात आली.

यामध्ये शाहूनगर, फुलेवाडी रिंगरोड, शाहू कॉलनी, चंबुखडी, विशालनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, न्यू शाहूपूरी, ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, कदमवाडी या भागामधील ८२ कनेक्शनधारकांकडून थकीत बिलापोटी रु.६४ लाख १५ हजार ६१५ इतकी थकीत रक्कम वसुली करण्यात आली. त्याचबरोबर सुलोचना माने, सदाशिव देवकुळे, उज्वला सुतार, जयेश बारोट, ताहीरहुसेन कुरणे, मेघदूत अपार्टमेंट, भाग्यश्री अपार्टमेंट, संजीव कुलकर्णी, हर्षद भेदा, श्रीपती लिंग्रज, बाळासाहेब शिंदे, जयसिंग कांबळे, शारदा सूर्यवंशी, अंबुताई काशीद, कय्यूम जमादार, लक्ष्मीबाई सांगावकर, रमेश पोवार, विष्णू पोवार, संभाजी दिंडे, बनाबाई वड्ड, सचिन घोसाळकर, अमृत भोगन, महादेवमूर्ती घुमास्ते अशा २३ नागरिकांची नळ कनेक्शने थकबाकीपोटी खंडित करण्यात आली आहेत.

ही कारवाई प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जल अभियंता हर्षजित घाटगे व अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही वसुली मोहीम येथून पुढेही सुरु राहणार असून, सर्व थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व थकबाकीदारांनी आपली थकीत त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत, आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.