कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेला द्रोणातील मोफत प्रसादाचे वाटप पुन्हा सुरू करण्यात आले.

हा प्रसाद पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत देण्यात येत आहे. प्रसादाचे वाटप नवग्रह मंदिर प्रांगणात सकाळी ९:३० वा. आरती नंतर करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. प्रसाद वाटप सुरु केल्याने भाविकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.