कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या भूमिकेबाबत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि कार्यकर्त्यांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर आज (रविवार) पाटील यांनी राधानगरी तालुक्यातील सोळांकूर इथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या मेळाव्यामध्ये पाटील यांनी आपली खदखद व्यक्त करत स्पष्टपणे राष्ट्रवादीबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

आजच्या मेळाव्यामध्ये ए. वाय. पाटील यांनी, त्यांच्या मनातली खदखद बाहेर काढली आणि कारखाना आणि राजकीय प्रवासांचे अनेक संदर्भ देत सातत्याने मी कसा डावल गेलो आहे याचा उल्लेख केला. हे सर्व करत आपण संयमीपणे धोरण आखत येणाऱ्या कांही दिवसांमध्ये आपली भूमिका पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी बोलून जाहीर करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

एकंदरीत आजच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ए. वाय. पाटील उघडपणे असणारी नाराजी व्यक्त करणार का ? तर भविष्यामध्ये आपला निर्णय जाहीर करण्यासाठी दिलेली मुदतीमध्ये पाटील यांची समजूत घातली जाणार का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.