गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कै. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीला अखेर आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आमदार हसन मुश्रीफ यांच्या बेरजेच्या राजकारणातून या निवडणुकीसाठी ‘समविचारी आघाडी’ची मोट बांधण्यात आली असून प्रचाराचा नारळही आजचं माद्याळ येथील श्री सोमलिंग देवाच्या साक्षीने फोडण्यात आला.

जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि गत विधानसभा निवडणूक विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्या विरोधात चुरशीने लढलेले अप्पी पाटील यांना सामावून घेऊन आ. मुश्रीफ यांनी आधीचं आघाडी घेतल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादीत पडलेली आ. मुश्रीफ आणि आ. पाटील यांच्या गटातील फुट बाजूला ठेवत आज समविचारी आघाडीने धडाकेबाज शुभारंभ केला.

यावेळी गोडसाखरचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, उदय जोशी, संग्रामसिंह कुपेकर, मलगोंडा पाटील-औरनाळकर, अॅड. दिग्विजय कुराडे आदींनी मनोगत मांडले. यानंतर लगेचच नूल, हसूरचंपू, हेब्बाळ, मुत्नाळ, दुंडगे, निलजी, हिटणी, औरनाळ, शेंद्री, हनिमनाळ या गावच्या कार्यकर्ते आणि सभासदांच्या भेटी गाठीही घेण्यात आल्या. शिवाय उद्या (शुक्रवार) हूनगिनहाळ, भडगाव, जरळी, मुगळी, तनवडी, हणमंतवाडी, खमलेट्टी, चन्नेकुप्पी, शिंदेवाडी, चिंचेवाडी, हरळी, वैरागवाडी, हसूरवाडी आणि हसूरसासगिरी आदी गावांच्या दौऱ्याचे आयोजनही समविचारी आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आलंय.

यावेळी बाळासाहेब कुप्पेकर, प्रकाश पत्ताडे, किरण पाटील, दीपक जाधव, विद्याधर गुरबे, सदानंद हत्तरगी, जयश्री पाटील, शिवप्रसाद तेली, श्रीशैल पाटील, जितेंद्र शिंदे, कृष्णराव वाईगडे, तानाजी पाटील, तानाजी शेंडगे, रवी घेज्जी, शिवाजी गवळी आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना तसेच अप्पी पाटील गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.