कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा व पथदिव्यांसाठी विजेचा कार्यक्षम वापर करण्यासह वीज बिले नियमित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार आडके यांनी केले.

पंचायत समिती चंदगडच्या वतीने सरपंच व ग्रामसेवक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आडके यांनी मार्गदर्शन केले. आ. राजेश पाटील, तहसीलदार विनोद रणवरे, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांची उपस्थिती होती. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या वीज विषयक समस्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चंदगड उपविभागीय अभियंता विशाल लोधी, सहायक अभियंता (स्थापत्य) विश्वजित कांबळे यांची उपस्थिती होती.