टोप (प्रतिनिधी) : शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि धगधगती मशाल हे चिन्ह शिवसैनिकांनी घराघरात पोहोचवावे. तसेच  उद्धव ठाकरे यांचे सर्व समावेशक नेतृत्व महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे. यामुळे भविष्यात शिवसेना राज्यात अधिक सक्षम होईल. असा विश्वास जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी शिरोली येथे व्यक्त केला. ते हातकणंगले विधानसभा मतदार संघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात बोलत होते.

मुरलीधर जाधव म्हणाले की, धगधगती मशाल हे चिन्ह शिवसेनेसाठी नवी क्रांती घडवेल. तसेच राज्यात शिवसेना पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी माजी पं.स. सदस्य अनिल खवरे, जि.प. चे माजी सदस्य महेश चव्हाण, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवन, तालुका प्रमुख बाजीराव पाटील, उपसरपंच सुरेश यादव, शहरप्रमुख राजकुमार पाटील, प्रल्हाद खोत, तात्यासो उनाळे, हरी पुजारी, संदीप दबडे आदी उपस्थित होते.