कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सर्वत्र साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी  आज (रविवार) सकाळी करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील  शहिद जवान संग्राम पाटील यांच्या वीर पत्नी हेमलता पाटील यांच्या हस्ते कागलकर हाऊस येथे ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच थोर समाजसुधारक गोपाळकृष्ण गोखले यांचे पणतु कॅप्टन विकास गोखले यांच्या हस्ते जि.प.च्या मुख्य इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर भारत पाकिस्तान फाळणीच्या अनुषंगाने भित्तिचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.

यावेळी अजयकुमार माने, डॉ. रवि शिवदास, मनीषा देसाई, व्ही. टी. पाटील, अरुण जाधव, प्रियदर्शिनी मोरे, शिल्पा पाटील, महेंद्र क्षीरसागर, अशोक धोंगे, डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.