कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद झाले असून त्यामुळे शिवाजी विद्यापीठाच्या होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे दिनांक १० व ११ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर होणार आहे